Monday, January 5, 2009

सात वर्षांनी फुलणारी कारवी.
फुलांचा रंग, आकार आणि सुगंधही वेगवेगळा असतो. ही फुले जगातल्या प्रत्येक अधिवासात, प्रत्येक कानाकोपऱ्यात आढळतात. ह्या फुलांच्या अक्षरश: लाखो जाती आज आहेत आणि त्यातील प्रत्येकाचे स्वत:चे असे वैशीष्ट्य आहे. आपल्याला जरी ही फुले मनमोहक वाटत असली तरी त्या झाडाकरता ती त्यांच्या वंशवृद्धीकरता फार उपयोगी ठरतात. झाडाची फलधारणा होण्याकरता परागीभवन आवश्यक असते आणि हे परागीभवन या फुलांमार्फतच होते. जातीनुसार फुलांमधे पुरूष आणि स्त्री भाग वेगवेगळे असतात आणि त्या फुलांचे परागीभवन त्याच जातींच्या दुसऱ्या फुलांबरोबर होते. वेळप्रसंगी त्याच फुलामधेसुद्धा परागीभवन होऊ शकते.
अतिप्राचीन काळी जेंव्हा झाडांना बिया येत असत त्यावेळी त्यांचे परागीभवन वाऱ्यामार्फत होत असे. मात्र त्यानंतर जेंव्हा फुले येणारी झाडे उत्क्रांत झाली तेंव्हा हे पराग वाहण्यासाठी खास यंत्रणा सज्ज झाली. ही फुले खास प्राण्यांना आकर्षित करण्यासाठे बनवली गेली. अर्थातच हे परागाचे "कुरीयर" ने आणण्यासाठी अनेक किटक कामाला लागले आणि त्यामोबदल्यात त्यांना त्यांचे खास अन्न मिळाले. हा त्यांचा मोबदला म्हणजे उच्च प्रथिनयुक्त मधुरस. ह गोड मधुरस अनेक किटकांचे मुख्य अन्न आहे. यात फुलपाखरे, मधमाश्या, ढालकीडे असे कीतीतरी किटक आहेत. या किटकांना हा मधुरस फुलांना भेट देण्यासाठी प्रवृत्त करतो आणि कळत नकळत परागाचे इथुन तिथे प्सरण झाल्याने त्या फुलाचे परागीभवन होते.
फुलांतील मधुरस आणि परागकण हे तर या किटकांना मोबदला म्हणून तर मिळतातच पण ह्या फुलांवर आकर्षित होण्यसाठी फुले अनेल क्लुप्त्या वापरतात. या फुलांचे रंग अतिशय उठावदार आणि आकर्षक असतात त्यामुळे त्यावर हे किटक सहज आकर्षिले जातात. त्याचप्रमाणे बऱ्याच फुलांचा सुगंध अतिशय मनमोहक असतो यामुळे सुद्धा अनेक किटक त्या फुलांवर आकर्षीत होतात. ज्या फुलांना सुवास असतो ती सहसा पांढऱ्या रंगाची असतात आणि प्रसंगी रात्री फुलतात. पण रात्री जरी फुलत असली तरी त्यांचा गंध एवढा जबरदस्त असतो की किटक त्यावर आकर्षित होतातच.
आपण नर्सरीमधुन जेंव्हा गुलाबाचे किंवा इतर फुलझाड आणतो तेंव्हा आपण अशी अपेक्षा करतो की त्यावर सारखी फुले यावीत. मात्र निसर्गात असे कायम घडत नाही. प्रत्येक फुलाचा फुलायचा हंगाम ठरलेला असतो आणि त्या हंगामातच त्या झाडाला फुले बहरतात. ह्या "कारवी"ची तर न्यारीच तर्हा आहे. ही चक्क दर सात वर्षांनी फुलते. पण फुलते ती अशी जबरदस्त की डोंगरच्या डोंगर अगदी जांभळे करून सोडते. ही कारवी किटकांमधे अतिशय प्रिय आहे आणि सतत त्यावर अनेक किटक घोंगावत असतात. सात वर्षांनी फुलल्यामुळे तीच्यापासून मिळणारा मधही तसा थोडास महाग आणि दुर्मीळच असतो. २००० साली कारवी फुलली होती त्यावेळी माझ्याकडे "फिल्म" कॅमेरे होते आज २००७ साली परत कारवी "डिजीटल"च्या जमान्यात फुलली आहे. सध्या ठाण्याच्या जंगलात, राजमाची, कर्नाळा, वाडा, सिंहगड, पुरंदर, कास अश्या अनेक ठिकाणी ही गडद जांभळ्या रंगाची फुले आपल्याला आढळतील. पण जर का आपण या वर्षी ही फुले बघीतली नाहीत तर थेट २०१४ सालापर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


No comments:

Post a Comment