कोळ्यांच्या नराला मिलनानंतर लगेच पळ काढावा लागतो कारण यात त्याने जरादेखील दिरंगाई केली तर बलवान मादी त्याचाच फन्ना उडवायला कमी करत नाही. त्यामुळे मिलनानंतर नर तेथून लगेच पळ काढतो आणि पुढेसुद्धा तो अंड्यांची, पिल्लांची काहीही काळजी घेत नाही. मादी एकटीच याकरता पुर्णपणे समर्थ असते आणि ती तीच्या या पालनपोषणाच्या कर्तव्यात कुठीही कमी पडत नाही. मिलनानंतर अंदाजे २/३ आठवड्यानंतर अंडी घातली जातात. ही अंडी मादीनेच विणलेल्या खास मऊसूत पण मजबूत अश्या धागयांच्या पिशवीत ठेवली जातात. ही पिशवी सुरक्षीत जागी ठेवली, बांधली जाते आणि

कोळ्यांची अंडी अर्थातच अतिशय लहान असतात आणि त्यातल्या जीवाचा विकास एखाद्या पक्ष्याच्या पिल्लासारखाच होतो. योग्य वेळी कोळ्यांची चिमुकली पिल्ले आपल्या अंड्याचे कवच तोडून बाहेर येतात. त्यांना तिथे रेषमाच्या पिशवीचे अजून एक संरक्षक आवरण असते त्यामुळे सगळी बाहेर आलेली पिल्ले घोळक्याने त्या पिशवीतच काही काळ वास्तव्य करतात. त्यांच्या शरीरातच त्यांना पुढे काही दिवस पुरेल असा अन्नसाठा साठवलेला असतो. तो संपेपर्यंत ते तिथेच आत सुरक्षीत रहातात आणि या काळात त्यांची वाढ जोमाने होते. ज्या जातींमधे त्यांची आई त्यांच्याबरोबर रहात नाही ते हळूहळू पिशवी बाहेर

आपल्याकडे कोळी हा सुद्धा तसा दुर्लक्षिलेलाच विषय आहे आणि अगदी सध्या सध्या त्यांचा थोडाफार अभ्यास सुरू झाला आहे. राजस्थानचा माझा मित्र धर्मेंद्र खंडाल याने काही काळापुर्वी मुंबईच्या कोळ्यांचा अभ्यास केला आणि त्याच्या नोंदीप्रमाणे फक्त मुंबईच्या आसपास २००हून अधिक कोळ्यांच्या जाती आढळतात. त्यातसुद्धा कित्येक जाती आपल्या विज्ञानात आतापर्यंत नोंद झाल्याच नव्हत्या. अश्या दुर्लक्षित, छोट्याश्या पण अनेक रंगी आणि वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या ठिकाणी रहाणाऱ्या कोळ्यांची छायाचित्रे जमवणे म्हणजे निखळ आनंद देणारे पण थोडेफार किचकट काम आहे. हे वेगवेगळे कोळी शोधणे म्हणजे मोठा व्याप असतो. पण अश्याच शोधाअंती मात्र क

युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
No comments:
Post a Comment